डोंबिवली : विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे. कावळ्यांचे विस्थापित गांव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबर्लि गावचे ग्रामस्थ आणि प्राध्यापक मढवी यांनी आगरी भाषेवर प्रबंध पूर्ण करून ही पदवी प्राप्त केली आहे. आगरी मायभाषेचे पाहिले विद्यावाचस्पती याचा अभिमान तसेच उंबर्लि गावचे ग्रामस्थ म्हणून गावकऱ्यांनी मढवी यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी पत्रकारांशी पी.एचडी आणि आगरी भाषा यावर विस्तृत भाष्य केले.

मुबई, ठाणे, रायगड आणि पालघर आदी जिल्ह्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र म्हणून आगरी समाजाचे महत्व मोठे आहे. पूर्वापार हा आगरी समाज पारंपरिक धार्मिक चालीरीतीशी निगडित असून तो त्या व्यवस्थेशी घट्ट रूतून आहे. आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची जिद्द असल्याने ” आगरी समाज आणि त्याची सामाजिक स्थिती” या विषयावर प्रबंध करून त्याबाबतचा विस्तृत अभ्यास गेली सहा वर्षे केला. त्यामध्ये यशस्वी झालो आणि त्या विषयावर विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी मिळवली आहे. या अभ्यासक्रमात कळून आले की, आगरी समाज विज्ञाननिष्ठ असावा असे प्रतिपादन “आर्थिक आणि सामाजिक अभ्यास आगरी समाजाचा” या विषयावर डॉक्टरेट मिळविलेल्या प्रा. डॉ. सुरेश तुकाराम मढवी यांनी उंबर्लि ग्रामस्थांनी गौरव आयोजित केला होता.