डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदिरानगर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपाइचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, युवा जिल्हा अध्यक्ष जय जाधव, शहर सचिव दिनेश साळवे, उपाध्यक्ष दिलिप काकडे, कार्याध्यक्ष किशोर मगरे, युवक अध्यक्ष सतिश पवार, तुकाराम पवार इंदिरा नगर वॉर्ड अध्यक्ष तेजस जोंधले उपाध्यक्ष धम्मपाल सरकटे इत्यादी उपस्थित होते.
उदघाटन झाल्यानतंर जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव म्हणाले की, आमच्या पक्षाचे समर्थक प्रामुख्याने ज्या वसाहती मध्ये राहतात तेथे हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. अजुनही या वस्त्यांमध्ये मूलभूत समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी अशा कार्यालयाचा उपयोग होउ शकतो. नगरसेवक असताना या प्रभागात कामे केली आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत की, वस्ती-वस्तीत कार्यालये सुरु करावी. त्यामुळे तेथील स्थानिक प्रश्न सोडविता येतील. विशेष म्हणजे कार्यालयातून पक्षाची बांधणी करण्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होउ शकतात. बाहेर गेलेले पुन्हा पक्षात येतील असेही शहर अध्यक्ष गायकवाड म्हणाले.
अंकुश गायकवाड़ व प्रल्हाद जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकारी तेजस जोंधले व धम्मपाल सरकटे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठल खेडकर, बलखंडे, नाना धेंडे, राजेश भालेराव, भारत भालेराव, जय जोशी, अमोल मोरे, सागर इंगले, मंगेश कांबळे, डॉ. संदिप पाईकराव यांच्यासह रिपाई कार्यकर्ता व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.