अतिदुर्गम भागातील तरुणांना उद्योग-धंद्यासाठी प्रिशक्षण

डोंबिवली : मराठी माणसाने उद्योजक व्हावे आणि यामध्ये अतिदुर्गम भागातील तरुणांना संधी मिळावी यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. याच धर्तीवर ठाणे जिल्हयातील आदिवासी व अनुसुचित जातीतील युवक-युवतींना लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने महराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे कल्याण जवळील शहाड येथील टाटा पॉवर कौशल्य विकास केंद्रात 18 दिवसांचे मोफत प्रिशक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला आदिवासी तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अतिदुर्गम भागात तरुणांना उद्योग सुरु करता यावे यासाठी हे प्रिशक्षण दिले जात आहे.

या प्रिशक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोखाडा येथे एक दिवसीय उद्योजगता परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात 300 पैकी 70 तरुणांची निवड करण्यात आली. प्रशिक्षणासाठी 35 च्या दोन तुकडया करण्यात आल्या होत्या. यामध्ये 32 युवक व 5 युवतींचा समावेश आहे. अतिदुर्गम जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील तरुणांचा यामध्ये समावेश आहे.

डोंबिवलीतील उद्योजक व ‘कामा’ या उद्योजकांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जेाशी यांचे संबंधित तरुणांना मार्गदर्शन मिळाले. याबाबत जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, वंचित आदिवासी व अनुसुचित जाती प्रवर्गातील घटकांपर्यत उद्योजकतेचा प्रसार व प्रचार व्हावा हा उददेश आहे. प्रशिक्षणार्थिंना 10 लाखापर्यत अल्प व्याजाने कर्ज देण्यात येणार आहे. 18 दिवसांचे प्रशिक्षण संपल्यानंतर तरुणांनी आपल्या भागातच कुटिर उद्योग सुरु करावा अशी यामागे संकल्पना असल्याचे त्यानी सांगीतले. शहाड येथील टाटा पॉवर प्रशिक्षण केंद्रात निवास व जेवणाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये तज्ञांची व्याख्याने आणि प्रत्यक्ष उद्योगांना भेटी असा कार्यक्रम असून बुधवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रशिक्षार्थि डोंबिवली औद्योगिक विभागातील काही उद्योगांना भेट देणार असल्याची माहितीही जोशी यांनी दिली. याबाबत प्रकल्प प्रमुख संजय भामरे म्हणाले, प्रशिक्षार्थिना व्यक्तीमत्व विकास, उद्योग यांची संधी, निवड, बाजारपेठ, सर्वेक्षण, विक्री कौशल्य असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाणे व पालघर जिल्हयातील आदिवासी व अनुसुचित जातीतील युवक-युवतींनी सहभागी होण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन त्यानी केले.