कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना नको, स्वयंविकास योजना राबवा

डोंबिवली : समूह विकास योजना म्हणजे क्लस्टर योजना. मात्र घरमालक व भाडेकरुंना विश्वास न घेता ही योजना राबविण्याचा हेतू दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत कलस्टर योजना नको, स्वयंविकास योजना राबवा कारण विकासाचे धोरण जनता ठरवेल असे वक्तव्य डॉ. गिरीशकुमार  साळगावकर यांनी डोंबिवलीत रविवारी प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या आयरेगाव भूमिपुत्र संघर्ष कृती समितीच्या बैठकीत केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फत दत्तनगर आयरेगाव येथील सरकारी तसेच मोठ्या प्रमाणात भूमिपुत्राच्या खाजगी जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेतील त्रुटी संदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत संतोष केणे, राहुल केणे, प्रणव केणे, नितीन पाटील, काळू कोमास्कर, नंदू धुळे, एकनाथ म्हात्रे, मधुकर माळी, डॉ.गिरीशकुमार साळगावकर, तुकाराम केणे, हनुमान महाराज, ऍड. शशी पाटील, दयानंद म्हात्रे, उदय मुंडे, जीवन केणे ऍड. शशिकांत फाटक, प्रेमनाथ पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान उपस्थित नेतेमंडळीनी शहरात होऊ घातलेल्या या योजनेतील मूळ कल्पनेवर आक्षेप नोंदविला. याबाबतीत संतोष केणे म्हणाले, आमचा योजनेला विरोध नाही, पण योजना आणून जर आमचे नुकसान होत असेल तर नक्कीच आवाज उठणार ! क्लस्टर विषयी ऍड. साळगावकर यांनी उपस्थित लोकांना सांगितले की,  कलस्टर योजना बनली कशी? हे समजून घ्या. समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजना आहे. अशी योजना बनविताना याची साधक -बाधक चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत या योजनेची ना हरकत ना चर्चा असं काहीच झाली नाही. या योजनेतील गाभा लक्षात घेतला पाहिजे. काही वेळा असं वाटतं की, नागरिकांनी एकत्र येऊन नये म्हणून ही योजना लादली जाते का? कारण मालक व भाडेकरू याच्यातील भेदभाव दाखविला जात आहे. सामाजिक व भौगोलिक रिपोर्ट बनविला जातो. हा रिपोर्ट आजपर्यत मराठी भाषेतून तयार झाला नाही. इंग्रजी भाषेतून सामान्य लोकांना कस समजणार. प्रथम ही योजना काय आहे हे जनतेला समजले पाहिजे. स्वार्थी वृत्ती सोडली तर सर्वांचे भले होईल. आयरे गावाची जबाबदारी घेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ही योजना आखतान प्रबोधन केले का? या योजनेत समाविष्ट व्ह्ययचं कि नाही यासाठी भूखंडधारकांचा निर्णय ग्राह्य धरला पाहिजे. जमिनीबाबतचा अधिकार पालिका सांगू शकत नाही. ते महसूल खातेच ठरवू शकते. आपलं गाव, घर वाचविण्यासाठी आवाज उठवा. मुंबईचा विकास होण्यासाठी भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी शासनाला मोफत दिल्या आहेत. आयरेगाव सुदंर बनविण्याची हिम्मत तुमच्यात आहे. प्रामाणिकपणा असला कि गावाचा विकास होईल. गावाचा विकास कसा झाला पाहिजे. ही योजना  विकासकांना विकली आहे का? आमची जमीन आहे आम्ही बघू अशी हिम्मत ठाणेकरांनी ठेवली. ही ताकद आहे भुमीपुत्रांची आहे. शासनाच्या जमीनी फुकट देण्याचे काम म्हणजे क्लस्टर योजना आहे.