डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : सांस्कृतिक नगरीच्या शिरपेचात दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एक नव्या नाट्य थिएटरची निर्मित झाली तेव्हा सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला. शहरात कला क्षेत्रात आपली ठसा उमटवणारी अनेक व्यक्तिमत्वे या गोष्टीची वाट पहात होते. आणि झालेही तसेच सावित्रीबाई फुले नावाने नाट्यगृह मोठ्या दिमाखाने सूर झाले. उद्या त्या वैभवशाली नाट्यगृहाचा दशकपूर्ती सोहळा होत असून शेकोडोच्या संख्येने कलाकार आपल्या कलाविष्कार सादर करणार आहेत.
वर्धापन दिनाच्या पूर्वसंधेला अनेक कलाकारांनी आपली हजेरी लावून विविध कामांत हातबोट लावले आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या प्रवेश द्वारासमोर असलेल्या नेटश्वराचा परिसर सुशोभित करण्यात येत आहे. याबाबत खास सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे १५० कलाकार वर्धापन सोहळ्याच्या कार्यक्रमात कला उत्स्फूर्तपणे सादर करणार आहेत. यामध्ये शहरातील तंत्रज्ञ, एलईडीवॉल, साऊंड कलाकार विनामूल्य नटराज्याच्या चरणी कला अर्पण करणार आहेत. आणि हे सर्व आमचं मंदिर आहे म्हणून करणार आहेत. गेल्या वर्षी अशा कार्यक्रमाला प्रारंभ झाला होता आणि यावर्षी आता त्याचे मोठे स्वरूप दिसून येईल. या विशेष कार्यक्रमासाठी मधुकर चक्रदेव, सुधीर जोगळेकर यांनी मोठे सहकार्य केले आहे. अशा या नाविन्यपूर्ण वर्धापन दिनाच्या सोहळ्यास संध्याकाळी ६.३० वाजता महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी. वेलरासु, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. दोन तास चालणाऱ्या कला अविष्कारामध्ये कथक पासून क्लासिकल नृत्यापासून ते वेस्टर्नपर्यंतची नृत्ये होणार असून स्थानिक संगीत कलाकार कला सादर करणार आहेत. विषेश म्हणजे शहरातील दंतचिकित्सक डॉक्टर मंडळींनी एका संस्था स्थापन केली असून त्यांचा दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहे.
नाट्यगृहाच्या तिकीट आरक्षण व्यवस्थेचे मोहन सुतावणे यांनी सांगितले कि, नाट्यगृह निर्मिती नंतर पहिला कार्यक्रम झाला तो म्हणजे “दिवाळी पहाट” या कार्यक्रमात सुरेश वाडकर यांच्या गायकीने रसिक तृप्त झाले. नाट्यगृहात आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. त्याचप्रमाणे गझल सम्राट जगजीत सिंग यांच्या गझलचा कार्यक्रम झाला आहे. तसेच बेला शिंदे, उदित नारायण, सुमन कल्याणपूरकर, महेश काळे यांच्या कार्यक्रमाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जेव्हढि नाटके आली ती नाटके या रंगभुमीवर आली आहेत. पण त्यात एकच खंत आहे ती म्हणजे मच्छीद्र कांबळी या ठिकाणी वस्त्रहरणचा प्रयोग घेवून येवू शकले नाहीत कारण हे नाट्यगृह सुरु होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. परंतु विक्रम गोखले, रीमा लागू, भारत जाधव, प्रशांत दामले, शरद पोंक्षे, यांच्यासारख्या मात्तब्बर कलाकारांनी आपले प्रयोग सादर केले आहेत. अशा या सांकृतिक शहरातील नाट्यगृहाचा दहावा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे त्याची तयारी जोरात सूरु आहे.