महात्मा गांधीच्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ स्वप्नपुर्तीची पूर्तता करणार — डीआरएम एस. के. जैन

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या अस्वछेतेबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या अनेक तक्रारी आणि येणाऱ्या दीडशे वर्षीय महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने होत असलेली स्वच्छता आदी गोष्टींची पहाणी करण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या डीआरएम एस. के. जैन यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाला शुक्रवारी भेट दिली. दरम्यान होत असलेल्या कामांची पाहणी करून महात्मा गांधीच्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ स्वप्न पुर्तीची पूर्तता करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील स्थानकाच्या स्वच्छतेचे काम योग्यरित्या होत असल्याची पावती त्यांनी दिली.

डोंबिवली स्थानकाला दिलेल्या भेट माध्यमातून जैन यांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी केली. फलाटावर सफाईचे काम सुरु असून रंगरंगोटीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याबाबत त्यांचाशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि, येथील सुधारणा होत आहेत परंतु अधिक चांगल्या सुधारणा व्हायला पाहिजेत. मुळात कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सहकार्य मिळाले पाहिजे. कोणत्याही स्थानकाचे रस्ते चांगले नसतील आणि स्थानक कितीही चांगले असले तरी त्याचा काहीच फायदा नसतो आणि यासाठी नागरिकांचे सहकार्यही गरजेचे आहे. स्वच्छतेसाठी 38 कर्मचाऱ्यांची एक टीम केली असून सात मशीन आणि त्यावर तीन अधिकारी देखरेख करीत आहेत. आमचा असा प्रयत्न आहे कि 2 ऑक्टोबर पूर्वी म्हणजे महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती पूर्वीच ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या स्वप्नपुर्तीची पूर्तता करणार आहोत.

यावेळी त्यांनी पुढे सांगितले कि, जो कल्याण दिशेला असणारा पूल नवीन करायचा आहे तो जून – 2019 पर्यत पूर्ण होणार. आणि विशेष म्हणजे कल्याण येथील पत्रीपुलाचे काम होण्यासाठी संबंधित आराखडा एमएसआरडी कडे पाठविण्यात आला आहे. येथील सर्व कामे चांगली होतील आणि आपण सर्व हे सांगण्यासाठी माझ्याकडे याल अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.