कचरा दुर्गंधी प्रकरणी बालाजी गार्डन नागरिकांचे आमदार राजू पाटील यांना साकडे

डोंबिवली : पालिका प्रशासन “स्वच्छ-सुंदर डोंबिवली” साठी अग्रेसर आहे असा टेंबा मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. कचरा मुक्त शहर म्हणून लोखो रुपये खर्च केले जातात. नागरिकांना ओला-सुका कचरा वर्गीकरण करून देण्याची सक्ती केली जाते. त्याची दखल घेऊन करदाते नागरिक प्रशासनाला पाहिजे तेव्हढे सहकार्य करीत असतो. मात्र असे असूनही पालिका अधिकारी वर्गीकरण केलेला कचरा घेऊन जात नाही असा प्रत्यक्ष अनुभव येत असून त्याला कंटाळलेल्या रहिवाशांनी अखेर आमदार राजू पाटील यांच्याकडे या समस्येचे साकडे घातले. आमदार पाटील यांनी लागलीच घनकचरा उपयुक्त रामदास कोकरे यांची रहिवाशीयांसह भेट घेऊन त्यांना खडे बोल सुनावले.

डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. तसेच गेल्या चार पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने आवारात दुर्गंधी पसरली आहे. पालिकेच्या सूचनांनुसार तेथील रहिवासी ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन पालिकेस सहकार्य केले जात असतानाही मात्र त्यांना सहकार्य करण्यास पालिका टाळाटाळ करते.

मनसेआमदार राजू पाटील यांनी रहिवाशांसह पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली. पालिका कचरा उचलत नाही हे बरोबर नाही. करदात्यांना असा त्रास देऊ नका. यानंतर कोकरे यांनी कचरा उचलला जाईल असे सांगितले. मात्र पालिका अधिकारी फक्त आश्वासन देतात ते पुरतात करीत नाहीत असा आमचा अनुभव आहे. जर उद्या कचरा उचलला नाही तर आमच्या सोसायटीतील कचऱ्याचे पिंप आम्ही पालिका आवारात टाकू. आमच्या सोसायटीत जेष्ठ नागरिक तसेच दुर्धर रोग असणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून त्यांच्या जीवाचे दुर्गंधीमुळे काही बरेवाईट झाले तर याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असे सोसायटीतील जबाबदार तरुणांनी यावेळी पालिका आवारात पत्रकारांना संगितले.

घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांना सुनावले खडे बोल