( माजी नगरसेवक धात्रक यांची आयुक्तांकडे मागणी )
डोंबिवली : धोकादायक परिस्थितीत असलेली डोंबिवली पश्चिम दीनदयाळ रोडवरील विष्णूनगर पोस्ट ऑफिस कार्यालयाची इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. या इमारतींच्या आवारात रस्त्यावर फेरीवाले, भाजीवाले व्यवसाय करतात. पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे सदर इमारत कोसळू शकते. या शक्यतेत जीवित हानीही होईल. ,परिणामी यापूर्वीच ही वास्तू जमीनदोस्त करावी अशी मागण भाजपा माजी नगरसेविका मनीषा धात्रक आणि नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्तांना केली.

पश्चिममधील भाजपा माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी प्रभाग क्र.६० गणेश मंदिर, एलोरा सोसायटी भागात नागरिकांना रस्त्यावर चालण्यासाठी मोकळे रस्ते असावे या करिता रस्त्यावर फेरीवाला बसू म्हणून दक्षता घेऊन परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. त्यामुळेच गेल्या आठ-दहा वर्षापासून फेरीवाला मुक्त परिसर होऊन स्टेशनला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्ते मोकळे व सुटसुटीत मिळत आहेतर. परंतू गेल्या काही दिवसांपासून पुन्हा फेरीवाले बिनदिक्कत बसू लागले आहेत. पालिकेच्या फेरीवाला हटाव नियंत्रण विभागाकडे कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई करता येत नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. ही बाब म्हणजे पालिका अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यांना छुपा पाठिंबा आहे का असा प्रश्न धात्रक विचारत आहेत. यामुळेच फेरीवाल्यांवर कारवाईसाठी मनीषा धात्रक यांनी गेल्याच आठवड्यात पालिका प्रशासनाला पत्र दिले. पण कोणतीच कारवाई होत नाही. अखेर नगरसेविका मनीषा धात्रक व नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्ताची भेट घेत बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी तसेच जुने पोस्ट ऑफिस धोकादायक जीर्ण इमारत त्वरित जमीनदोस्त करावी अशी मागणी माजी नगरसेविका मनीषा धात्रक व नगरसेवक शैलेश धात्रक यांनी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.