( भाजप डोंबिवली विधानसभा प्रमुख तथा माजी उपमहापौर राहुल दामले यांचे स्पष्टीकरण )
डोंबिवली : रेल्वे स्टेशनवरील प्रवाश्यांचा वाढता भार, वाढीव गृहसंकुले आदी गोष्टींबाबत यावर विचार नक्कीच केला जाईल. इतकेच नाही तर महायुतीच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा नक्की असेल असे वक्तव्य भाजप डोंबिवली विधानसभा प्रमुख तथा माजी उपमहापौर राहुल दामले यांनी डोंबिवलीत करणे.

मंगळवारी डोंबिवली जिमखाना येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दामले बोलत होते. यावेळी भाजप कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, माजी नगरसेवक राहुल दामले, मुकुंद ( विशू ) पेढणेकर, संदीप पुराणिक, मंदार हळबे, दत्ता माळेकर, मितेश पेणकर, शिवसेना ( शिंदे गट ) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, विवेक खामकर, बंडू पाटील, संजय पावशे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट )चे डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी, ऍड. ब्रम्हा माळी उपस्थित होते.
दरम्यान शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले, डोंबिवली व महाराष्ट्राचा विकास पुढे जाईल. मंत्री रवींद्र चव्हाण हे यावेळी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवतील असा आम्हाला विश्वास आहे. एकही रस्ता डांबरीकरण नाही तर सिमेंट कॉन्ट्रीटीकरण होईल. भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे म्हणाले, मंत्री रवींद्र चव्हाण हे यावेळीची निवडणूक नक्कीच जिंकणार.
तर राहुल दामले यांनी पुढे सांगितले की, ठाणे जिल्ह्यात 40 ते 42 टक्के मतदान होतात. यावेळी मतदानाचा टक्का वाढेल. नांवे वगळली गेली आहेत अशा तक्रारी लोकसभा निवडणुकीत येत होत्या त्या सर्वांची नावे मतदान यादीत असतील असा आम्हाला विश्वास आहे. मागील वेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे एक लाख पेक्षा जास्त मतदारांना मतदान करता आले नाही त्यांना विधानसभा निवडणुकीत यांना मतदारांना मतदानाचा हक्क बाजवता येईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता भाजपचे राहुल दामले म्हणाले, अशा मतदारांची नावे मतदान यादीत नक्कीच असेल.
प्रवास करताना रेल्वेतून पडून अनेक डोंबिवलीकर मृत्यूमुखी पडलेले आहेत याबाबत पत्रकरांनी विचारले असता महायुतीतील पदाधिकारी म्हणाले, डोंबिवली स्टेशनवरील प्रवाश्यांचा वाढता भार, वाढीव गृहसंकुले आदी गोष्टींबाबत यावर विचार नक्कीच करू व महायुतीच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा नक्की असेल.