( डोंबिवलीकर आनंद हर्डीकर यांचं सोशल मीडियावरून आवाहन )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील आजपर्यंतच्या सर्व आयुक्तांमध्ये व प्रशासकांमध्ये हे जे प्रशासक बदलून गेले त्यामधून इतका सामान्य जनतेला डावलणारे एकही आयुक्त पाहणीत आले नाहीत. 1982 पासून पालिकेच्या मुख्य कार्यालयात जाऊन भेट होत होती. पण आता बदलून गेले आयुक्त हे पहिलेच भेट न देणारे आयुक्त अनुभवला आले. त्यामुळे नवीन पदभार घेतलेल्या आयुक्तांनी डोंबिवलीकरांना भेट द्यावी असे वक्तव्य डोंबिवली शहरातील आनंद हर्डीकर यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये पुढे म्हटले आहे की, नवीन आयुक्तांना विनंती त्यांनी डोंबिवलीकरांसाठी महिन्यातून एक दिवस तरी भेट द्यावी व त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधावा. गरज संवादाची आहे संवाद न झाल्यास वाद वाढतात सामान्य माणसाची सेवा करायची असेल तर मुख्य अभियंता आणि आयुक्त डोंबिवलीच्या जनतेवर कृपा करा महिन्यातून एक दिवस तरी फिक्स आमच्यासाठी ठेवा. निम्मे करदाते डोंबिवलीतला आहेत, माजी आयुक्त तिथे गेल्यावर सुद्धा भेटत नसत हे आपले सेवक का आमचे शेट ? गप्रभात क्षेत्र कार्यालयात आलेला अनुभव फार त्रासदायक होता. कार्यालय नवीन, जवळ झालं आहे, पण तिथला शिपाई आपलं नाव सांगायला सुद्धा तयार नाही, त्याच्या गळ्यात ओळखपत्र सुद्धा नाही, उलट काय करायचे तुम्हाला माझं नाव अशा तऱ्हेने उद्धट आणि उर्मट बोलणं होतं, कोण शिकवणार आणि कोण यांना काय करणार कारवाई? जे जे दिसेल ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान? करदात्यांसाठी शिपाई सुद्धा अशी हुज्जत घालतो, कार्ड दाखवूनही तरी मला नाव सांगितलं नाहीच ओळख सांगितली नाहीत.
शिपाई इतके भारी? असेही रामचंद्र नगर परिसर रहिवासी संघाचे अध्यक्ष आनंद हर्डीकर तथा डोंबिवलीतील प्रख्यात डॉक्टरांनी हे भाष्य केले आहे. त्यांनी डॉक्टर ही ओळखही पालिकेतील शिपाई यांना दिली नाही तर एक साधा डोंबिवलीकर म्हणून विचारणा केली होती, नवीन आयुक्त या सर्व प्रकाराकडे खरचं लक्ष देतील का असे आता डोंबिवलीकर याबाबत विचारत आहेत.
