( पलावा चौकात वाहतूककोंडीला मोकळीक )डोंबिवली : ठाणे, मुंबई, नवीमुंबई गाठण्यासाठी महामार्ग असलेल्या कल्याण शीळ रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण झाली होती. यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सोडवणूक होण्यासाठी पलावा येथे नवीन उड्डाणपुलाची निर्मिती झाली. नुकताच शिवसेना (शिंदे गटाने) या पुलाचे लोकार्पण घाईघाईत केले. मात्र ताबडतोब काही कारणामुळे काही काळासाठी प्रशासनाने तो पूल बंद केला. यामुळे मनसे व शिवसेना (उद्धव) या विरोधकांनी प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले, प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली. त्यावरून दोघांनीही सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाला कठघऱ्यात खेचले. मात्र असे असले तरी लोकांसाठी ताबडतोब उड्डाणपूल सुरू व्हावा ही इच्छा सत्ताधाऱ्यांची असल्याने पुलाचे लोकार्पण झाले. आता या उड्डाणपुलाबाबत राजकीय सवाल-जबाब होत असले तरी पलावा उड्डाणपूलामुळे काही प्रमाणात वाहतूककोंडीतून मोकळीक मिळाल्याचे लोकं सांगत आहेत.



