आमदार नरेंद्र पवार यांची विधानसभेत मागणी : २७ गावांच्या विकासासाठी ५०० कोटी निधिची ठोक तरतूद करा

डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : विधानसभेत आमदार नरेंद्र पवार कल्याण – डोंबिवली शहरातील महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट असलेल्या त्या २७ गावांची नगरपालिका निर्माण करा आणि जो पर्यंत या गावांची वेगळी नगरपालिका होत नाही तो पर्यंत त्या परिसराच्या विकासासाठी ५०० कोटीचा विशेष विकास निधीची मागणी केली. कल्याण डोंबिवली शहराचा क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत सहभाग करावा आणि शहरातील आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि रखडलेले बीओटी प्रकल्प आदी विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले.

त्यांनी पुढे सांगितले कि, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या पालिकेच्या रुग्णालयाची अवस्था बिकट असून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. यामुळे या रुग्णालयानां जिल्हा रुग्णालयांचा दर्जा द्यावा अशी मागणी केली.

त्याचप्रमाणे कल्याण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक पर्याय असलेल्या गोविंदवाडी बायपास वरील एक पुल कमकुवत असल्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. यामुळे संबंधित पुलाबाबत योग्य निर्णय घेऊन अवजड वाहने गोविंदवाडी बायपासवरुन सुरु करण्याबाबत निर्देश देण्याची विनंती सरकारला केली. तसेच महापालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीओटी प्रकल्पांबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली.