प्राध्यापिका वासंतीताई ठाकूर यांना मातृगौरव पुरस्कार प्रदान

डोंबिवली, दि. ०१ (प्रतिनिधी) : शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेला मातृगौरव पुरस्कार नुकताच प्राध्यापिका वासंतीताई ठाकूर यांना समारंभाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री तथा जेष्ठ नेते जंगन्नाथ पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानधन आणि मानपत्र असे स्वरूप होते. यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ठाकूर यांनी सांगितले कि, जीवनात कितीही उंचीवर पोहचलात तरी मातृभाषेची नाळ जपण्याचा प्रयत्न करा.

पूर्वेकडील पाथर्ली येथील श्री मंगल सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्याच्या व्यासपीठावर जेष्ठ समाजसेवक नानासाहेब पाटील, तुळशीराम जोशी, स्थानिक नगरसेवक महेश पाटील, निलेश म्हात्रे, मनोज घरत, शंकर पाटील, संस्थेचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, कार्याध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे आदी उपस्थित होते.

यावेळी अशोक म्हात्रे म्हणाले, मातोश्री सरलाबाई बाबुराव म्हात्रे यांच्या स्मृतिदिनाचे औतिच्य साधून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे नववे पुष्प असून आगरी समाजातील जेष्ठ साहित्यिका प्रा. वासंतीताई ठाकूर यांना प्रदान होत आहे याचा आनंद होतो. त्यांनी बालपणापासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जीवनाची वाटचाल केली आहे. त्या संवेदनशील कवीमनाच्या असून त्यांनी आगरी भाषेतील साहित्याला मराठी साहित्यात मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. सदर मातृगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यास नरेंद्र म्हात्रे, सरलाबाई विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक तसेच अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.