डोंबिबली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका माध्यमातून सत्ताधारीपक्ष तसेच प्रशासन यांनी विकासाच्या नावावर पायाभूत सुविधांची वाट लावली आहे. कोणतेही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत करदात्या नागरिकांची दैना होत आहे. याचा निषेध म्हणून 1 एप्रिल म्हणून “एप्रिल फुल…डब्बा गुल ” कधी पुर्ण होणार डोंबिवलीचे पुल अशी आरोळी देऊन केक कापला आणि निषेध नोंदवला.
डोंबिवलीतील नवीन जोशी हायस्कुल पुलावर मनसेचे शहरअध्यक्ष मनोज घरत, माजी जिल्ह्याप्रमुख तसेच माजी विरोधीपक्षनेते प्रकाश भोईर शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी अनोखे आंदोलन केले. 1 एप्रिलच्या मुहूर्तावर पूर्व-पाश्चिमला जोडनाऱ्या जोशी ब्रीजवर दुपारी एक कापून पालिका प्रशासनाच्या कामाची लक्तरे वेशीवर टांगली. यावेळी त्यांनी शहरातील समस्या म्हणून एक कापून पालिका प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले. यावेळी प्रकाश भोईर म्हणाले, कल्याण-डोंबिवली शहराची वाताहत झाली आहे.वर्षानुवर्षे लोकांना चाचपडावे लागत आहे. पत्रीपूल, दुर्गाडीपूल, माणकोलीपूल, जोशीपूल, निळजेपूल, कोपरपूल आदी पुलांमुळे वाहतूक कोंडी होऊन दोन्ही शहरातील समस्या वाढल्या आहे. विकासकामांच्या नावाने नसगरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. पत्रीपूलही आंदोलने केल्यावर झाला आता बाकीचे पूल कधी होणार हे प्रशासन सांगत नाही. फक्त तारीख पे तारीख देऊन लोकांना मूर्ख बनवत आहेत. निषेध आंदोलन करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून त्यांना काम करावे असे वाटावे हा उद्देश आहे. पण जर असाच कानाडोळा होत राहिला तर मात्र मनसे “खळ खट्याक” करून प्रशासनाला वठणीवर आणेल अशी चर्चा दरम्यान आंदोलनात होती.
एप्रिल फुल…डब्बा गुल ” कधी पुर्ण होणार डोंबिवलीचे पुल अशी आरोळी देऊन केक कापला