कडोंमपा मध्ये फेरीवाल्यांसारखे आयुक्त बदलतात !

( मनसे आमदार राजू पाटील यांची टीका )

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका माध्यमातून दर्जेदार विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. असे असले तरी आयुक्तांच्या वारंवार बदल्या होत असतात. कोणत्याही आयुक्तांना पूर्ण काळ कामकाज करता येत नाही. ज्याप्रमाणे फेरीवाले आपल्या जागा बदलतात तशी परिस्थिती पालिका आयुक्तांची होत आहे.  याविषयी आमदार राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे टीका केली असून आयुक्त बदलले आता फेरीवलेही हटवा असे संकेत दिले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पसलिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (भाप्रसे) याची राज्य शासनाने नुकतीच बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. इंदूराणी जाखड (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे. माजी आयुक्त  दांडगे यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांची रवानगी करण्यात आली आहे. डोंबिवली शहरात फेरीवाले हटविण्यासाठी मनसेने आंदोलन केले. याविषयी तत्कालीन आयुक्तांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राज्य शासनाने त्यांचीच बदली केली आहे. यामुळे आता नवीन विद्यमान आयुक्त या विषयात कोणती भूमिका घेतात हा संशोधनाचा विषय होणार आहे. पुन्हा फेरीवाले प्रकरणाची श्रीगणेशा होणार आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरचे फेरीवाले काही उठवले जात नाहीत. आता नवनियुक्त आयुक्त मॅडम नक्कीच चांगले बदल करतील अशी आशा करू या !  त्यांचे कल्याण- डोंबिवलीत मनसे स्वागत अशा पोस्ट माध्यमातून नवनियुक्त आयुक्तांचे लक्ष आमदर राजू पाटील यासनी वेधले आहे.