पक्षवाढीसाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी एकत्र या — अंकुश गायकवाड

डोंबिवली, दि. ०३ (प्रतिनिधी) : पक्ष बांधणी होणे आवश्यक आहे त्यासाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या (आठवले गट) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केले.

झोपडपट्टी धारकांना आकरण्यात येणारा पालिका कर, स्मार्ट सिटी अंतर्गत वस्ती पातळीवरील विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे प्रलंबित काम, पक्ष  संघटन याबाबतीत महिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, युवक आघाडी अध्यक्ष सतीश पवार, कार्याध्यक्ष किशोर मगरे, उपाध्यक्ष वसंत टेकाळे, विरल खेडकर, विकी खैरनार उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली पालिकेने पुतळ्याबाबत प्रलंबित असलेली समस्या न सोडल्यास येत्या काही दिवसात प्रखर आंदोलन करण्यात येइल. प्रथम आयुक्तांची भेट घेणार येणार असून त्यांच्याकडे आमच्या मागण्या मांडू. स्मार्ट सिटी अंतर्गत झोपडपट्यांसाठी  निधीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र व राज्यशासनाकडून हा निधी संकलीत केला जाणार आहे. या निधीचा योग्य विनीयोग होतो की नाही यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने “एसीओ” पदासाठी डोंबिवलीतील कार्यकर्ते यांची नावे देण्याचे काम सुरू आहे. कर आकारणी करण्यात येणार आहे. ती भरमसाठ आहे ती कमी करण्यात यावी. जेणेकरून गरीब ती भरु शकतील. आमच्या रिपाईचा झोपडपट्टी महासंघ अस्तित्वातच नाही. काहि तथाकथित कार्यकर्ते चिरीमिरीसाठी अशाप्रकारे संघाच्या नावाखाली काम करीत आहेत. यावेळी जोत्स्ना रोकडे, शुभू नायर यांनी पक्षप्रवेश केला.