डोंबिवली, दि. ०७ (प्रतिनिधी) : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘जाम’ सूची तयार होत आहे. “जाम” म्हणजे प्रत्येक व्यक्तिचं बँक जनधन अकाऊंट खातं, आधारकार्ड आणि हातात मोबाईल. “जाम” या त्रिसुत्रीमुळे संपूर्ण महाराष्ट्र आज जवळजवळ ९३ टक्के जोडला गेला आहे. योजना पूर्वीही होत्या पण योजनांचा फायदा लार्भाथींना मिळत नव्हता. पण आता ‘डायरेक्ट बेनिफिट टा्रन्स्फर’मुळे योजनांचा फायदा लार्भार्थीना तात्काळ मिळत आहे असे वक्तव्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.
डोंबिवली ग्रामीण विभागातील देसलेपाडा भोपर येथे ग्रामीण भाजपचे उपाध्यक्ष संदीप माळी यांनी सामुदायिक रक्षाबंधनाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी राज्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, शिवाजीराव आढाव्ह, शशिकांत कांबळे, ग्रामीण भाजपचे अध्यक्ष महेश पाटील, ठाणे जिल्हा महिला मोर्चा पदाधिकारी शुभा पाध्ये, नगरसेविका रविना माळी, परिवहन सदस्य प्रसाद माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, डोंबिवली-कल्याण परिक्षेत्रात जनसामान्यांची कामे सरकारी योजनेतंर्गत सूरु आहेत. बारवी धरणाच्या वाढीव उंचीमुळे ग्रामीण भागतील प्रामुख्याने पाण्याची समस्या सुटेल. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागाचा आमदार भाजपाचा असेल अशी जाहीर घोषणा त्यांनी केली. बारवी धरणाची उंची वाढविण्यात येत आहे. उंची वाढल्यामुळे धरणाच्या पाणलोटक्षेत्रात वाढ होइल. त्यामुळे अनेक गावे बुडणार आहेत. या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न राज्याच्या वतीने सोडविण्यात येत आहे. बाधितांच्या घरातील एका व्यक्तीस नोकरी व त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येत आहे. धरणाची उंची वाढल्यामुळे त्यातील पाणीसाठा वाढेल व ग्रामीण भागाला मुबलक पिण्याचे पाणी मिळेल.
ते पुढे म्हणाले, भाजपा सर्वसामान्य जनतेच्या हीताची कामे करीत आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणांचा अर्धा खर्च सरकार करीत आहे. लोकांच हीत, सबका साथ सबका विकास या उद्देशाने काम होत आहे. मुख्यमंत्र्यांनी एक अभिनव योजना सुरू केली आणि जवळजवळ २७ लाख ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी एक विडा उचलला. पाच वर्षामध्ये ही गांव दुष्काळमुक्त करायची आहेत. दोन वर्षात जवळजवळ साडे तेरा हजार गांव जलमुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळमुक्त झाली आहेत. सरकारमधील घटक पक्ष पाय ओढण्याचं काम करीत आहेत तरीसुध्दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने लोकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून जेव्हढे निर्णय घेता येतील तेव्हढे घेत आहेत. शेतकऱ्यांच हित कशात आहे यासाठी प्रयत्नशील आहे. ३० हजार कोटी पेक्षा जास्त कर्ज माफी करण्यात आली. पीक विमा योजना प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचं काम सरकार करीत आहे. येत्या काळामध्ये विद्यार्थी, कामगार किंवा सर्वसामान्य कोणीही व्यक्ति आणि मध्यमवर्गीस माणसांच जीवन सुखकर कसं झालं पाहिजे यासाठीचा प्रयत्न केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यमध्ये फडवणीस सरकार करीत आहे.
रक्षाबंध सणाचे औतिच्य साधून उपाध्यक्ष संदीप माळी यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित सोहळ्यात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना भगवान श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली. सोहळ्यात सुमारे चार हजार महिलांनी सहभाग घेतला. यावेळी प्रत्येक महिलेला पाच किलो गव्हाचे पीठ आणि स्टीलचे ताट,वाटी,पेला साहित्य भेट म्हणून दिले. यावेळी महाराष्ट्राची लोकधारा, लावणी नृत्य, माऊली आदी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा उपस्थितांनी आनंद घेतला.