डोंबिवली : केंद्रापासून ते गावपातळीवर भ्रष्टाचाराचा स्पर्श होऊ नये यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याच्या अनेक वार्ता समोर येत असतात. डोंबिवली जवळील खोणी गावाचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनीही या विषयी पुनरुच्चार करून यावर शिक्कामोर्बत केले. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत किती कामे झाली याची संपूर्ण कुंडली माहितीच्या अधिकारात मागून घेतली आहे. दरम्यान यापूर्वीही ग्रामपंचायतिच्या कारभारात भ्रष्टाचार झाला तो समोर आणला जाईल. खोणी गावात भ्रष्टाचार होऊ देणार नसून गावाचा विकास करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार अशी स्पष्ट कबुली विद्यमान सरपंच हनुमान ठोंबरे यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी 15 ऑगस्ट रोजी खोणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्याक्रमच्या अध्यक्षीय भाषणात ठोंबरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचात पदाधिकार तसेच पंचायत समिती सदस्य किरण ठोंबरे उपस्थित होते.
खोणी ग्रुप-ग्रामपंचायत सुदृढ असून स्वतःच्या ताकदीवर विकास कामे होत आहेत. खासदार-आमदार यांचा निधी या गावासाठी खर्ची झाला नाही. नेते मोठ्या-मोठ्या गप्पा मारतात परंतु परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी खासदारांनी आमचे गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. मात्र ती जाहीर वाणी अर्धवटच राहून खासदारांनी दुसरेच गांव दत्तक घेतले अशी टीका सरपंच ठोंबरे यांनी केली. गावाला सुमारे 10 कोटीचा महसूल मिळाला असून अनेक विकासाची कामे होत आहेत. विकास कामांमध्ये तीन डांबरीकरण रस्ते, सात कॉंक्रीटीरस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण, दलित वस्तीसाठी जनरेटर वाहन, दलित वस्तीतील प्रत्येक घरत इर्व्हटर, संपूर्ण गावात पेवरब्लॉक, नवीन पाण्याची पाईपलाईन, शौचालय बांधणी आदी विविध विकासाची कमी झाली आहेत. आणि प्रत्यक्षात माझ्या कारकिर्दीत किती कामे झाली याची संपूर्ण यादी माहितीच्या अधिकारात मागून घेतली आहे. यामुळे फायदा असा झाला कि पूर्वीची कामे होताना त्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला याची विस्तृत माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्व काही पारदर्शक असून जर राजकीय फायद्यासाठी कोणी आरोप करीत असेल तर त्या आरोपावर ग्रामस्थांनी विश्वास ठेवू नये. खोणी गावाचा आदर्श इतर ग्रामपंचायतीनी घ्यायला पाहिजे. त्यामुळ ग्रामस्थांनी ग्रामसभेत कोणत्याही गोष्टीची मागणी करा ते आपल्याला तत्काळ मिळेल असेही सरपंच हनुमान ठोंबरे यांनी सांगितले. तत्पूर्वी किरण ठोंबरे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून निधी गावासाठी आणला जाईल असे सांगून स्वातंत्र्य दिन सोहळा कार्यक्रमात राजकारण कोणीही आणू नये. सर्वांनी गावाच्या विकासासाठी एकजूट होवून सहकार्य करा असे सांगितले. दरम्यान शाळेतील माजी विद्यार्थांच्या विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेतील शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन विद्यार्थांकडून सादर करण्यात आलेली भाषणे अतिशय लक्षवेधी ठरली. उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थांचे कौतुक केले.