आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या अँप तर्फे मिळणार योजनांचा लाभ

(विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन )

डोंबिबली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना अस्तित्वात आहेत. या योजना युवा तसेच जनसामान्यांपर्यंत पोहचाव्या या करिता भाजयुमोर्चा आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राची प्रत्येक जिल्ह्यात सुरु होणार आहेत. आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र अँपचे”उदघाटन होणार असून त्याद्वारे समाजातील सर्व घटकांपर्यंत आत्मनिर्भर भारत या अभियानातील सर्व योजनांचा लाभ पोहचविण्याचे काम पूर्णत्वास येइल असे वक्तव्य भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी डोंबिवलीत केले.

भाजपा कल्याण जिल्ह्यात आरती देशमुख संयोजक म्हणून काम पाहणार असून इतर 9 जण सहसंयोजक म्हणून काम पाहणार असून भाजयुमो जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई ह्यांच्या नेतृत्वात ही टीम काम करेल. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध योजना, त्यासाठी लागणारी सर्व माहिती, त्यासाठी लागणारे फॉर्म्स आणि सर्व योजनांचा लाभ कुठून व कसा घ्यावा या संदर्भातील विस्तृत माहिती या केंद्राच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी डोंबिवली प्रवासात स्फूर्ती स्थळ येथे भेट देऊन स्मारकाचे अभिवादन केले. त्यांनी पै फ्रेंड्स लायब्ररीला भेट देऊन ‘मला भावलेले पुस्तक’ ह्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले.

भाजयुमो जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई यांच्या माध्यमातून डॉ. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून वाचकांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. डोंबिवली प्रवासात पाटील यांचे मंडल अध्यक्ष अमित चिकणकर, समीर भंडारी, मितेश पेणकर ह्यांनी स्वागत केले. कल्याण शहर, टिटवाळा शहर येथे कार्यकर्त्यांना भेटून संघटनत्मक घोषणा करण्यात आल्या. यावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मंत्री आनंद जोशी, प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण, देवेश पाटील, परेश गुजरे, प्रदेश सचिव प्रसाद कोडीयाल, प्रदेश युवती संयोजक मीना केदार हे ह्या दौऱ्यात उपस्थित होते.