डोंबिवली : वाहतूक सुरळीत व्हावी, कल्याण डोंबिवलीकरांचे जीवन सुसय्य व्हावे, पदपथ मोकळे व्हावेत याकरिता पदपथावरील अतिक्रमण हटविले आहे. पोलीस खाते आणि महानगर पालिकाप्रशासन यामध्येही बैठका होऊन यावर मार्ग काढण्यात आले आहेत. रस्त्यावरील कार पार्किंग हटवून टू व्हिलरसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करण्याचे निश्चित झाले आहे. फेरीवाल्यांना योग्य ठिकाणी जागा देण्यात येणार आहेत. दुकानासमोरील पदपथ दुकानदारांनी काबीज करीत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे आणि त्यानुसार पालिका कर्मचारी त्यानुसार काम करीत असून पालिका प्रशासन वाहतूक सुरळीत होण्यासाठी नेहमीच कार्यतत्पर आहे असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगर पालिका उपयुक्त सुधाकर जगताप यांनी डोंबिवलीत केले.
पोलीस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभाग ठाणे शहर वाहतूक उपविभाग डोंबिवली तर्फे 32 वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ या संकल्पनेनुसार उद्घाटन व आरोग्य शिविराचे आयोजन केले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालिका उपायुक्त सुधाकर जगताप, डोंबिवली विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, माजी नगरसेवक मंदार हळबे, अभिनेता सतीश नायकोडी, प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, स्नेहल करपे, सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सतीश नायकोडी म्हणाले, शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस अहोरात्र 24 तास आणि 365 दिवस जनतेची सेवा करण्यासाठी कार्यरत असल्याने आपण नागरिक सुखाने जीवन जगत आहोत. रखरखत्या उन्हात, पावसाळ्यात आणि थंडीच्या मोसमात ऊन,पाऊस,वारा याची पर्वा न करता तमा न बाळगता चौका-चौकात वाहतुक पोलीस काम करीत असतो त्यामुळेच आपला प्रवास सुखाचा होत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कुलकर्णी यांनी केले.
कोरोनापेक्षा अपघातात जास्त मृत्यू :
रस्त्यावरील होणारे अपघात आणि मृत्य कमी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत
— माजी नगरसेवक मंदार हळबे
कोरोना महामारीत जेवढे मृत्यू झाले त्यापेक्षाही अधिक मृत्यू हे अपघाताने होत असतात. असे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. यामुळे नक्की काहीच काळात नाही. अपघाताची महामारी आहे कि कोरोनाची महामारी आहे. अपघाती महामारी आहे असे गृहीत धरले तर मात्र यावर प्रभावी उपाय-योजना आपल्याला करावी लागणार आहे. अपघात कशामुळे होते याचे समजले तर नक्कीच माहित होते कि प्रशासन यासाठी कारण ठरत नाही. त्यामुळे जर प्रत्येकाने नीट काळजी घेतली तर अपघातात मृत्यूची संख्या कमी होईल. वाहतुकीचे नियम पाळा हे सर्वच जण सांगत असतात. पण यासाठी वाहतुकीची नियम न पाळण्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे आणि नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. वाहतूक सप्ताह निमि
त्ताने प्रशासनाला सहकार्य करण्याचा निश्चिय केला पाहिजे असे मनसे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी यावेळी स्पष्ट केले.