डोंबिवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आधारकार्ड हे सक्तीचे असले पाहिजे. त्याचबरोबर डिजिटल मोबाईल माध्यमातून “जाम” सिस्टीम म्हणजे जनधन, आधार नोंदणी मोबाईल असली पाहिहे. येणारा काळ हा देश तंत्रज्ञानाने शंभर टक्के जोडला जाईल. यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि प्रत्येक योजना पोहचविण्याचं काम याच “जाम” त्रिसूत्रीकडून होईल असा विश्वास भाजपा आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत व्यक्त केला.
केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या योजना जनतेपर्यंत जाव्यात म्हणून अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले. त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून अंगणवाडी सेविका याचे प्रशिक्षण भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळ येथे आयोजित करण्यात आले त्यावेळी चव्हाण बोलत होते.
यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा मंडल अध्यक्ष नंदू परब, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे, नगरसेविका सुनीता पाटील, नगरसेवक जालंदर पाटील, प्रमुख पदाधिकारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, प्रत्येकजण डिजिटल माध्यमांशी जोडला गेला पाहिजे. तंत्रज्ञानाशी जोडला जण म्हणजे मुख्य प्रवाहात सहभागी होणे. जनधन योजना असेल किंवा इतर योजना असतील त्या गरिबातल्या गरीबापर्यंत अशा योजनांद्वारे जोडलं जाणं गरजेचं आहे.
भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका प्रशिक्षण कार्यक्रमात कल्याण-डोंबिवलीतील 204 अंगणवाडीतील सेविकांना प्रकशिक्षण देण्यात आले. तसेच 215 इतर अंगणवाडीतील सेविकांना केंद्र सरकारच्या योजने माध्यमातून मोबाईल देण्यात आल्याची माहिती मनीषा राणे यांनी दिली. तर यावेळी अंगणवाडी सेविका समीरा म्हणाल्या, पोषण ट्रेकर या अप चे प्रकशिक्षण मिळाले असून आता वेगळ्या रजिस्टरचे काम करावे लागणार नाही आणि वेळ वाचेल. आता आम्ही सेवा देण्यास अधिक सक्षम होऊ शकतो.