देवीचे दर्शन आणि भंडाऱ्यासाठी मोठी गर्दी
डोंबिवली : तेलकोसवाडी हा पूर्वी दुर्लक्षित विभाग होता. या दुर्लक्षित विभागात विकास होण्यासाठी सर्व लोकांनी एकत्रित येण्याची गरज होती. सामाजिक कार्य आणि संघटित होणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक मंडळ गठीत करणे आवश्यक होते. विभागात बहुसंख्य लोकं कोकणातील असल्याने हा विचार पक्का झाला आणि आशिर्वाद मित्र मंडळाची स्थापना 1995 रोजी स्थापन झाली. आज डोंबिवली शहरात मंडळाची एक वेगळी ओळख झाली आहे. प्रमुख सल्लागार कडोंमपा माजी विरोधीपक्षनेते तथा अभ्यासू नगरसेवक विश्वनाथ राणे, माजी महापौर विनिता राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आशिर्वाद मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात जुनी डोंबिवली तेलकोसवाडी येथे होत आहे.
आशिर्वाद मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव दहा दिवस साजरा नवरात्रोत्सव करीत आहे. घटस्थापना व देवीची प्राणप्रतिष्ठा सोहळा असा मंडळाचा नियोजित असतो. नवऱरात्रौत्सवात सकाळ-संध्याकाळीआरती, रास गरबा, दांडिया गरबा, वेशभूषा स्पर्धा, भजन अष्टमीला होमहवन आणि भंडारा (महाप्रसाद) करिता मोठी गर्दी केली होती.

मंडळाचे अध्यक्ष गजानन देसाई, उपाध्यक्ष सुनील सावंत, सरचिटणीस विलास शिंदे, उपचिटणीस सदानंद पेडणेकर, कोषाध्यक्ष प्रदिप गोळे, उपखजिनदार संतोष घाणेकर, अंतर्गत हिशोब तपासनीस श्याम ढवळ, सदस्य विनायक राणे, संकेत सावंत, परेश गांवकर, विलास पाटणे, अजय पांचाळ, सुशांत पालेकर, ओंकार पेडणेकर, राहुल साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते मेहनत घेत असल्याने मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
आशीर्वाद मित्र मंडळ गोविंदा पथकाने कमीत कमी वेळात आठ थर लावत विक्रम रचला. यावर्षी पश्चिमेतील सम्राट चौकातील स्वराज्य दहीकाला महोत्सवाच्या दहीहंडी उत्सवात त्यांनी हे थर लावले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांनी आशीर्वाद मित्र मंडळ गोविंदा पथकाचे विशेष कौतुक केले.