समर्थ प्रतिष्ठानच्या तर्फे प्रल्हाद म्हात्रे यांचा समर्थ पुरस्कार देऊन गौरव

डोंबिवली : पश्चिम विभागातील रेल्वे मैदान केंद्रशासित या मोकळ्या भूखंडावरील अती दुर्गंधी व झाडांचे साम्राज्य असलेल्या जागेची निगा प्रल्हाद म्हात्रे यांनी स्व:खर्चाने जेसीबी मशीन लावून सपाटीकरण करून फिरण्याजोगी सुंदर केली. याच जागेवरती विसाव्या करिता सिमेंट बाकडे बसवून तेथे वृक्षांची व दगडांची रंगरंगोटी करून जेष्ठ नागरिक, यात्रेकरू, प्रवाशी नागरिक, विद्यार्थीमित्र व परिसरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी आनंदी वातावरण निर्माण केले. हे कार्य एक मोठे समाजतुल्य असून ते आपल्या सेवेतून सत्यात उतरविले. म्हात्रे यांच्या अनमोल कार्याची व यशस्वी व्यक्तीमत्त्वाची दखल घेवून समर्थ प्रतिष्ठान तर्फे समर्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

म्हात्रे यांनी सर्वांशी मित्रत्वाचे जाळे निर्माण करून सर्वांशी प्रेमाने वागणे, बोलणे, हसत-खेळत सभासंमेलन
गाजविणे हा स्वभाव सर्वांना परिचित आहे. विशेष म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अभंग त्यांच्या मुखोदत आहेत. त्यांच्यामते मानवी जीवनाचं ध्येय निश्चित झालं की, आपल्या जीवनकार्याची दिशा सापडते. केंद्रबिंदु असा असावा की आपल्या सर्व कृती परमेश्वराशी एकरुप असाव्या. म्हात्रे यांच्या माध्यमातून दिनदुबळ्या गरिब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य, गरिब नागरिकांना आरोग्य सेवेसाठी मदत, आपातकालीन घटनेत स्वतः हजर असणे त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्था, दहिहंडी उत्सव मंडळ, श्री गणेशोत्सव मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ यांना नियमित सहकार्य व प्रेमाची थाप त्यांच्याकडून मिळत असते. त्याचप्रमाणे आध्यात्मिक, सामाजिक, कला-क्रिडा, राजकीय क्षेत्रातही म्हात्रे यांच्या कार्याचा आलेख उल्लेखनीय आहे.