( माजी मंत्री रामशेठ ठाकूर यांचं प्रतिपादन )
डोंबिवली : डोंबिवलीकरांनी आगरी-कोळी नांव राखलं आहे. आगरी समाजात संत परंपरा प्रत्येकाच्या अंगात भिनली असून ती जपण्याचे काम आपल्या माध्यमातून होत आहे. कल्याण-डोंबिवलीत आगरी संख्या कमी होत आहे तीच परिस्थिती पनवेल उरण मध्ये आहे. समाज संघटीतपणे काम करीत आहे. आपली भाषा आपली बोलीभाषेवर प्रेम असून त्याच महत्व कायम ठेवावं लागेल त्यासाठी आगरी युथ फोरम हे काम करीत आहे वझे वक्तव्य माजी मंत्री तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामशेठ ठाकूर यांनी डोंबिवलीत केले.
दरम्यान २०व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, नवी मुंबई विमानतळ नामांतरण समिती अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, वसंत पाटील, गंगाराम शेलार, आशाताई पाटील, शरद गंभिरराव, सदानंद थरवळ, संजय पावशे, बंडू पाटील, सुरेश जोशी, नंदू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सव माध्यमातून अनेक वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून होत असतं. प्रत्येक वर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाची राज्यातील लोक वाट पहात असतात. नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच डोंबिवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येणार होते परंतु काही अडचणीमुळे त्यांना जमले नाही तरीही ते महोत्सव दरम्यान भेट देणार आहेत असे वझे यांनी सांगितले. आगरी कोळी गीतांचा कार्यक्रम, मराठी भाषेला राष्ट्रीय दर्जा या विषयावर परिसंवाद, आध्यात्मिक क्षेत्रावरील कार्यक्रम, समाजातील विवाह रीतिरिवाज माहिती, मराठी गीतांचा कार्यक्रम, लाखो पुस्तकांचे प्रदर्शन, कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीसह सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातील दिवंगत मान्यवरांच्या नांवे पुरस्कार वितरण होणार आहे असे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गुलाब वझे यांनी सांगितले.

यावेळी सिद्धी विनायक जुन मंदिर हे आगरी-कोळी समाजाने बांधलेले असल्याने आताच्या त्या समितीत आमचा एक आगरी-कोळी प्रतिनिधी असावा अशी मागणी करण्यात आली. तसेच कनसा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी दशरथ पाटील म्हणाले, दि. बा. पाटील असच नामकरण नवी मुंबई विमानतळाचे होईल यासाठी आम्ही आशावादी आहोत. समाजातील मुलं शासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर गेली पाहिजेत. तर जगन्नाथ पाटील म्हणाले, सतत वीस वर्षे कार्यक्रम करण ही सोपी गोष्ट नाही. पण समाजातील हे टीम वर्क आहे. समाजातील प्रत्येकाने शिकलं पाहिजे ही समाजातील प्रत्येकाला वाटत आहे त्यामुळे हा कार्यक्रम होत आहे. शासनाच्या योजनेतून समजतील व्यक्तीने रोजगार निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे.

यावेळी नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे म्हणाले, आपली संस्कृती टिकविण्याच काम या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. खाद्य सांस्कृतिचा स्वाद घेण्यासाठी हजारो लोक येथे येत असतात.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, एक संस्कृती आणि तिची जडणघडण, येथील आगरी बांधव आणि कोकणवासिय एकमेकांशी जोडलं आहोत. देशाला हेवा वाटणार साहित्य संमेलन येथे घडवून आणला आहे ते आगरी युथ फोरमच्या माध्यमातून झालं. राजकीय पुढाऱ्या बद्दलच काव्य एक आगरी कवीने केलं आहे त्याचा विचार करून सफेद कपडे न घालता वेगळेपण जपत आहे. राजकीय पुढाऱ्याच्या सफेद कपड्याबद्दल कोटी केली आहे ही त्या कवीची आठवण समोर ठेवली. सुलभा गायकवाड याचा विजय एक विचारधारेचा आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.