( संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांचे ठाम मत )
डोंबिवली : प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व धर्म सण वार याची माहिती असणे गरजेचे आहे या विषयावर जे एम एफ शैक्षणिक संस्था अंतर्गत शाळेचे सर्वेसर्वा डॉ राजकुमार कोल्हे आणि डॉ प्रेरणा कोल्हे समवेत डोंबिवली पत्रकार संघ माध्यमातून वार्तालाप कार्यक्रम झाला. दरम्यान जे एम एफ शिक्षण संस्थेत वर्षभर सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असते असे ठाम मत डॉ. राजकुमार कोल्हे यांनी व्यक्त केले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची शिस्तबद्ध जीवनशैली होण्यावर आमचा कटाक्ष असतो असेही कोल्हे म्हणाले.
जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर च्या मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये डोंबिवली पत्रकार संघातर्फे वार्तालाप कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष महावीर बडाला, सचिव प्रशांत जोशी तसेच इतर वृत्तपत्रांचे व वाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. दरम्यान सर्व उपस्थित पत्रकारांचे शाल देऊन डॉ. कोल्हे यांनी स्वागत केले.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, सण वार, याची माहिती असणे गरजेचे आहे.आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव असणारा देश आहे, त्यामधले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असणारा आणि संस्कृतीनी भरून पावलेला अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. असेच अनेक सण वार, कार्यक्रम, पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण या सर्व बाबतीत जन गण मन शाळा डोंबिवली मध्ये अग्रगण्य आहे.
शहरात देणगी विरहित ही आपली संस्था आहे त्या मागचा उद्देश काय असेही विचारण्यात आले, त्याचे उत्तर देताना संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, आपल्या भारतामध्ये अनेक ऋषी मुनी होऊन गेले, गुरुकुल पद्धतीने अध्यापन करून त्यांनी शिष्य घडवले, निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने अध्यापन केलेले शिष्य हे भविष्यात रथी महारथी घडले, कोणतीही अवाजवी शुल्क न घेता केवळ समाधानाची गुरुदक्षिणा घेतली जात असे, हेच धोरण ठेऊन कोणतीही देणगी न घेता जे एम एफ संस्था आजही कार्यरत आहे
शाळेत प्रति महाकुंभ मेळा, जी 20, राम लाला प्रतिष्ठापना, शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, नवरात्री, गणपती प्रतिष्ठापणा, नाग पंचमी, बैलपोळा, भोंडला, दिवाळी त्याच बरोबर इतर सर्व धर्माचे सण वर्षभर साजरे केले जातात, सर्व शिक्षक वर्ग यासाठी खूप प्रयास करून माहिती देखील देतात. सध्याच्या परिस्थिती मध्ये मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे , परंतु त्याचा होणारा अवाजवी वापर आणि जीवनावर होणारा वाईट परिणाम विचारात घेता एक दिवस मोबाईल शिवाय….हा दिवस देखील सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो, काटेकरपणे मोबाईल घरातूनच आणायचा नाही हा प्रतिबंध असतो असे संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे सांगितले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना, निम्म्या दरात प्रवास योजना , मोफत शारीरिक तपासण्या मुलांसाठी जे एम एफ बँक , रोजगार हमी, अशा अनेक योजना जे एम एफ संस्थेमध्ये राबविल्या जातात. शाळेच्या संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता केली.