डोंबिवलीत वीरांगना ट्रस्टच्या दुसरा वर्धापनदिन

डोंबिवली : वीरांगना ट्रस्टच्या तर्फे नुकताच दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ३० जुलै २०२३ रोजी वीरांगना ट्रस्टची स्थापना झाली असून संस्थेच उद्देश महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षणासाठी शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच योग शिक्षण देण्यात आले.गेल्या दोन वर्षांत ट्रस्टच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गंगा भागीरथी महिलांसाठी चंदन वंदन हा कार्यक्रम राबविण्यात आला. अनेक अनाथाश्रम, मतीमंद मुलांच्या शाळेसाठी मदत करण्यात आली. आगामी काळात वीरांगना ट्रस्टच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे वीरांगना ट्रस्टच्या अध्यक्षा उमा सिंग यांनी सांगीतले.

सदर वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आणि आगामी काळातील कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमेद केअर सेंटर आणि ओम पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. रंजना राजाराम पोवार, ओम इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका अध्यक्षा दर्शना सामंत उपस्थित होत्या त्यांनी कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले.वर्धापन दीन कार्यक्रमासाठी ग्लोब बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे माधव सिंग यांच्यासह चक्रपाणी शुक्ला, शेखर शिंदे, वर्धमान पाटील, दशरथ मगर आदि मान्यवर उपस्थित होते.