डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : आपण आपल्या मुलांना पैशाने मिळणाऱ्या सगळ्या सुखचैनी देतो पण सर्वात बहुमूल्य असा आपला वेळ जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण चांगले पालक होऊ शकत नाही असे वक्तव्य
प्रसिद्ध निवेदक हेमंत बर्वे यांनी यांनी डोंबिबली केले.
पूर्वेकडील शुभमंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात “पालक आहात कि फक्त आई बाबा” या विषयावर बर्वे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीतील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रणी असलेले माधव जोशी, क्लबचे अध्यक्ष दीपक काळे, रो. संदीप वैद्य, रो.विनोद देशपांडे, रोटरीचे सचिव के.सुब्रमण्यन, रो. दीपाले पाठक, रो. दत्ता कडुलकर, रो. मनोज क्षीरसागर, रो. दिलीप भगत, रो. डॉ.प्रल्हाद देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून मूल सुसंस्कारित करण्याची मोहीम सुरू होते. नेट, मोबाईल, चंगळ वाद, फास्ट फूड, पाश्चात्य जीवन शैलीचे अंधानुकरण, स्त्री कडे पाहण्याची दूषित दृष्टी अशा अनेक मुद्द्यांवर विविध उदाहरणाद्वारे मुलांवरील संस्कारांचे महत्व त्यांनी विशद केले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष दीपक काळे यांनी रोटरी क्लबच्या ‘ शेतकरी मेळावा, स्वच्छतागृहे, प्राईड रन आणि चिऊ पार्क अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आणि कार्याचा आढावा घेतला. प्रकल्प प्रमुख संदीप वैद्य यांनी आपल्या ‘मधुमालती’ या नवीन स्थापन केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेच्या वतीने वरील उपक्रम आयोजित केला होता. तर सहप्रकल्पप्रमुख रो. विनोद देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचासलन केले.