शेतकऱ्यांची खरी कर्जमुक्ती होईल तोच खरा सुदिन —– वंडार पाटील

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्य सरकाने जरी कर्ज मुक्ती जाहीर केली असली तरी राज्य सरकारचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञान धोरणांनुसार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस येत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची खरी कर्जमुक्ती होईल तोच खरा सुदिन असे भावनाप्रदान उद्गार राष्ट्रवादिचे ग्रामीण नेते वंडार पाटील पाटील यांनी केले.

पाटील कुटुंबीय आणि राष्ट्रवादि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वंडार पाटील यांचा वाढदिवस आज साजरा केला त्यावेळी ते बोलत होतें. डोंबिवली ग्रामीण विभागातील गोळवली येथील पाटील यांच्या घरात झालेल्या कार्यक्रमात गुलाब वझे, अभिनायू गायकवाड, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेली अनेक वर्षे सभापती म्हणून कार्यरत असल्याने शेतकऱ्यांची दु:ख जवळून पहिली आहेत. कल्याण तालुकातही अनेक शेककरी आपल्या परिस्थितीशी झगडत आहेत. मात्र कल्याण तालुका शहरपट्टीचा असल्याने शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दिसून येत नाही. कल्याण तालुक्यातही अनेक शेतकरी कर्ज मुक्तीची वाट पाहत आहेत. वाढदिवस आपण नेहमीच साजरे करतो पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल त्यानंतरचा वाढदिवस साजरा करण्यात अधिक आनंद वाटेल. राष्ट्रवादि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अशा कामांसाठी “तन मन धन” लावून काम केले पाहिजे असेही पुढे सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी वंडार पाटील यांना वाढदिवसच्या शुभेच्छ्या दिल्या. वाढदिवसच्या छोटेखानी कार्यक्रमात विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी वंडार पाटील यांना शुभेच्छ्या दिल्या.