डोंबिवली : सध्या उन्हाळ्याचे चटके बसत असताना ग्रमीण भागात मेाठया प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. निवासी भागातील कल्याण शिळ रोडवर देान तीन ठिकणी पाण्याची गळती होत असून औद्योगिक विभागाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहेत.
या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते राजू नलावडे यानी वारंवार औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयात लेखी व तोंडी तक्रारी केली. तसेच त्यांनी पाणी गळतीकडे लक्ष वेधले आहे. एका बाजूने ग्रमीण भागात नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत. आणि चोविस तास पाणीची गळती होत आहे. त्यामुळे त्यानी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही रिक्षाचालक, समाजकटक पाईपलाईन जॉइंट व व्हॉल्व्ह मध्ये छेडछाड करत असल्याचे त्यानी निदर्शनाला आणले आहे. यासंदर्भात मानपाडा पेालीस ठाण्यात तक्रारही दाखल केल्याचे त्यानी नमूद केले आहे. औद्योगिक विकास मंडळाने पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमले होते. ते कुठे आहेत असाही सवाल त्यानी केला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसताना चोविस तास पाणी गळती होत असल्याबददल संताप व्यक्त केला आहे.